कात्रज-कोंढवा भागात दोन वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा   

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये पाण्याची मुबलक साठा असूनदेखील दक्षिण भागात पाणी कपातीचा निर्णय पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केला. त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केल्यामुळे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने निर्णय मागे घेण्यात आला. परंतु, त्यानंतरही कात्रज-कोंढवा भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या भागातील पाणी कपातीचा निर्णय पूर्ववत पाणीपुरवठा केल्याचे विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, या भागात असलेल्या जलवाहिन्यांची पाणी वहन करण्याची क्षमता आपुरी असल्यामुळे या भागाला गेल्या दोन वर्षांपासून या भागाला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याचे, पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
 
जलसंपदा विभागाने पालिकेला पाणी जपून वापरण्याबाबतचे पत्र दिले होते. त्यानंतर, पाणी बचतीचे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून केले जात आहे. शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात मिळतच नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही पाणी टंचाई कमी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने पुण्याच्या दक्षिण भागात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणीकपातावरुन शहरात चांगलेच वातावरण तापले होते. त्यामुळे पालिकेने हा निर्णय मागे घेतला. त्यानंतर कात्रज-कोंढवा परिसरातील पाणी कपातीचा गंभीर बाब प्रकर्षाने समोर आली आहे. त्यामुळे शहरातील याच भागात अन्याय का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
 
पालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. मग या भागाला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांची क्षमता गेल्या दोन वर्षात का वाढविण्यात आली नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 
 

Related Articles